S
H
A
S
H
V
A
T
Whats-app.png

मिरची लागवड तंत्रज्ञान

मिरची लागवड तंत्रज्ञान

Picture1.jpg
• मिरची हे मूळचे दक्षिण अमेरिकेतील असल्याचे नोंदवले जाते आणि भारतासह सर्व उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वितरीत केले जाते. 15 व्या शतकाच्या शेवटी पोर्तुगीजांनी ते भारतात प्रथम आणले. आता हे थंड भाग वगळता जगभर घेतले जाते.
• मिरची हे सर्वात मौल्यवान मसाला पिकांपैकी एक आहे.
• मसालेदार बनवण्यासाठी ते मुख्यतः पदार्थांमध्ये एक घटक म्हणून जोडले जाते. भारतीय मिरची त्यांच्या तिखटपणा आणि रंगासाठी ओळखली जाते, विशेषत: आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात उगवलेली मिरची खूप प्रसिद्ध आहे.
• बाजारात हिरव्या मिरच्यांची वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशामधून देखील चांगली मागणी आहे. मिरची मध्ये अ व क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मिरचीचा संतुलित आहारात समावेश केला जातो. स्वाद आणि तिखटपणा यामुळे मिरची महत्त्वाचे मसाला पिक मानले जाते. मिरचीचा औषधी उपयोग सुद्धा केला जातो.
• मिरचीतील उग्रपणा ‘ कॅप्सिसीन’ या घटकामुळे येतो तर लाल रंग हे ‘कॅप्संथीन’ या रंगद्रव्यामुळे मुळे येतो.
• आकाराने मोठ्या असलेल्या काही मिरच्यांना भोपळी मिरची म्हणतात आणि भाजी म्हणून वापरतात.
• ताज्या आकडेवारीनुसार, मिरची उत्पादनात भारत अव्वल असून त्यानंतर चीन, पेरू, स्पेन आणि मेक्सिको यांचा क्रमांक लागतो. भारत हा मिरचीचा सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार आहे, जो जगातील मिरची उत्पादनात 40% योगदान देतो. भारतात आंध्र प्रदेश हे मिरची उत्पादनात आघाडीचे राज्य आहे.
• महाराष्ट्र राज्यात अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची होत असते. महाराष्ट्रातील मिरची खालील एकूण क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र हे नांदेड, जळगाव, सोलापुर, धुळे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे.
Picture1.jpg
 (krushipeth, krushidoctor, apnikheti, vikaspedia, krushinama, krushimaharashtra)
• मिरची पिकाची वाढ उष्ण आणि दमट हवामानात चांगली होते आणि उत्पादनही चांगले मिळते.
• या पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये करता येते. परंतू २० ते २५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यामुळे मिरची पिकाची वाढ चांगली होत नाही आणि त्यामुळे फुलधारणा व फळधारणा कमी प्रमाणात होते.
• अति पाऊसमान असल्याससुध्दा मिरची पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. त्यासाठी ४० इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले असते.
• उन्हाळी हंगामात तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास फुलांची गळ होऊन उत्पन्नात घट येते.
• ( krushidoctor, vikaspedia, krushinama, krushimaharashtra)
• साधारणपणे ७५ से.मी. पाऊसमान असलेल्या भागात ओल धरुन ठेवणाऱ्या काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू मिरचीचे पीक चांगले येऊ शकते.
• लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या आणि मध्यम ते काळी जमिनीमध्ये मिरचीचे पीक अतिशय चांगले येते.
• हलक्‍या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खते वापरली, तरी देखील मिरचीचे पीक चांगले येते.
• पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनी मध्ये मिरचीचे पीक अजिबात घेऊ नये.
• पावसाळ्यात आणि बागायती मिरचीसाठी पावसाळ्यात बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
• तर उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीवर मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरची पिकाचे उत्पादन चांगले येते.
पावसाळी मिरची लागवड: पावसाळी मिरची लागवडीचा हंगाम हा पावसाळ्याच्या सुरुवातीस म्हणजेच जून व जुलै महिन्यांमध्ये असतो. मिरचीची जास्तीत जास्त लागवड याच काळामध्ये होत असते जवळजवळ 50% पर्यंत लागवड ही याच हंगामामध्ये होते. या काळामध्ये म्हणजेच खरीप हंगामामध्ये मिरचीसाठी वातावरण हे खूपच पोषक प्रमाणात असते. या काळात लावलेल्या रोपांची मर ही होत नाही व झाडे देखील खूपच चांगल्या प्रकारे सुधारतात,पण या काळामध्ये मिरचीवर रोग येण्याचे प्रमाण हे अधिक असते. जसे की मूळ कुजवा, करपा, बॅक्टेरियल करपा व भुरी हे रोग या काळामध्ये मिरचीला खूपच त्रास देतात. या रोगांचे व्यवस्थितपणे व्यवस्थापन केल्यास पावसाळी मिरची लागवड ही परवडणारी ठरते.खरीप हंगामामध्ये जरी मिरचीची लागवड ही जास्त प्रमाणात असली, तरी या काळामध्ये मिरचीला दर हा चांगल्या प्रमाणात असतो. कारण प्रत्येक शेतकऱ्याने व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने केलेली नसते, बऱ्याच शेतावरती रोग येऊन पिक खराब झालेले असतात.
हिवाळी मिरची लागवड: हिवाळी मिरची लागवड म्हणजेच रब्बी हंगामातील मिरची लागवड. या हंगामा मधील मिरची ही ऑक्टोबर मध्ये लागवड केली जाते. नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये देखील आपण याची लागवड करू शकतो पण जास्त थंडीमुळे रोपांची जडणघडण या काळात चांगली होत नाही. त्यामुळे ऑक्टोबर मध्ये लागवड केलेली या काळामध्ये योग्य ठरते. ऑक्टोबर मध्ये लागवड केलेल्या प्लॉटचा दर हा थोड्या प्रमाणात कमी असू शकतो.पण मिरचीचे उत्पादन या काळामध्ये खूपच चांगल्या प्रमाणात येत असते. म्हणून जरी दर हा काही प्रमाणात कमी असला तरी आपल्याला उत्पादन चांगले निघाल्यामुळे चांगला फायदा होऊन जातो. हिवाळी हंगामामध्ये लागवड केलेल्या प्लॉट्सना मुळे व कीड - रोग व्यवस्थापन करणे गरजेचे असते.कारण जास्त थंडीमुळे मुळे ही व्यवस्थितपणे वाढत नाही व थंडीच्या काळामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव हा खूपच वाढत असतो. या काळामध्ये मुख्यत्वे थ्रिप्स तसेच पांढरी माशी, लाल कोळी व भुरी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. या रोगांचे आपण नियंत्रण केल्यास आपल्याला चांगले उत्पादन घेण्यास मदत होईल.
उन्हाळी मिरची लागवड: उन्हाळी मिरची लागवड ही १५ जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये केली जाते, पण काही प्रमाणामध्ये ही लागवड एप्रिल ते मे महिन्यांमध्ये देखील केली जाते. मिरची लागवडीचे काही हंगामांमध्ये फायदे असतात त्याचप्रमाणे तोटे देखील असतात त्यामुळे मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये मिरची लागवड केल्यामुळे तोटे ही पुढील प्रमाणे होतातः उन्हाळ्यामध्ये उन्हाचे प्रमाण हे जास्त असल्यामुळे तापमानात वाढ होऊन नवीन लावलेली रोपे असतात ती रोपे जास्त तापमानामुळे मरून जातात. उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड करणे व त्यांची वाढ करणे हे खूपच अवघड जाते. उन्हाळी हंगामात मिरची लागवड केलेल्या शेतामध्ये फुलांच्या अवस्थेमध्ये मिरचीचे फुल हे जास्त तापमानामुळे गळून पडते व उन्हाळ्यामध्ये मिरचीला पाण्याचा ताण देखील जास्त देता येत नाही. तसेच रस शोषक किडींचा प्रादुर्भाव देखील या काळामध्ये जास्त होत असतो जसे की थ्रिप्स, पांढरी माशी, लाल कोळी, तुडतुडे याप्रमाणे. उन्हाळी हंगामात मिरची लागवड केल्यामुळे ज्याप्रमाणे तोटे आहेत त्याप्रमाणेच फायदे देखील आहेत. जसे की उन्हाळी हंगामात मिरची लागवड केलेल्या पिकाला तुलनेने इतर हंगामात घेतलेल्या पिकापेक्षा दर जास्त लागतो. तसेच रोग देखील कमी येतात म्हणजेच करपा, भुरी, मूळ कुजवा या प्रकारचे रोग हे कमी असतात, पण किडींचा प्रादुर्भाव हा असतोच.
• लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची खोल नांगरणी करून जमिनीला उन्हात चांगले तापू द्यावे जेणेकरून मातीतील कीड व रोग यांचे व्यवस्थापन होईल. त्यानंतर ४-५ वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
• हेक्‍टरी २०-२५ टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून लागवडीसाठी जमीन तयार करावी.
• लागवडी अगोदर २ किलो अझोस्पिरीलीयम + २ किलो फोस्फोबक्टेरिया प्रती हेक्टरी २० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पुरवून घ्यावे.
• वाणाच्या प्रकारानुसार अंतर ठेवून सरी वरंबे तयार करुन बांधून घ्यावेत.
chilli_2.jpg
• वाणांची निवड करताना, वाणाचा कालावधी , कीड व रोगांना प्रतिकारशक्ती, जमिनीचा प्रकार, सिंचनाची उपलब्धतता इ. बाबी विचारात घेणे गरजेचे आहे.
• त्यानुसार रंग, आकार व लांबीनुसार मिरचीच्या भरपूर जाती लागवडीसाठी उपलब्ध आहेत.
• वाळलेल्या मिरचीसाठी पातळ साल, कमी बिया आणि घट्ट देठ असलेली मिरचीची जात योग्य असते (काही ठिकाणी यामध्ये विविधता आढळू शकते.)
• तर हिरव्या मिरचीसाठी लांबट, चकाकीयुक्त व आकर्षक हिरवी, फिक्कट हिरवी जात योग्य आहे.
वाण कंपनी परिपक्वता (लावणीनंतरचे दिवस) फळांची लांबी (सेमी) फळांची रुंदी (सेमी) सालीची जाडी
NS-28 नामधारी सिड्स
NS-2132 नामधारी सिड्स
NS-2572 नामधारी सिड्स 70-75 8-10 ०.९-१.० पातळ
NS-230 नामधारी सिड्स 65-70 11-13 1.3-1.4 मध्यम जाड
इंड्म- 5 इंडो – अमेरिकन हायब्रीड सिड्स 65 9-10 1.3 मध्यम जाड
गुंटूर वंडर नुझिविडू सिड्स 12 1.4
नित्या नोवेल सिड्स
अरुनिम सेमिनीस सिड्स 110-115 9-11 1.5
8913 सेमिनीस सिड्स 110-120 8.5-10 1.5-1.7
1081 ननहेम्स सिड्स 15 1.3
341 ननहेम्स सिड्स 9-10 1.2
प्रीती ननहेम्स सिड्स 14-15 1.2-1.3
तलवार कलश सिड्स 85-90 7-9
Red हॉट सकाता सिड्स 90-100 7-8
5531 सिंजेटा सिड्स 70-80 10-12
नंदिता ननहेम्स सिड्स 12-13 1.2
Picture1.jpg सद्यःस्थितीत अद्यावत रोपवाटीकेंमध्ये लागवडीस तयार असलेली रोपे उपलब्ध असतात अशा रोपांची निवड करतांना-
• रोपे ४० ते ४५ दिवसांची व ४ ते ६ इंच उंचीची असावी.
• पानांची संख्या ६ ते ८ असावीत.
• रोपांना कणखरता येण्यासाठी, रोपांना ऊन दिलेले असावे.
• ऊन दिले नसल्यास उत्पादकाने लागवडीपुर्वी रोपांना ३ दिवस ऊन दयावे. यामुळे प्रत्यक्ष शेतात रोपांची मर होत नाही. लागवडीपुर्वी प्रोट्रे मधील रोपांच्या कपांमध्ये जैविक खतांची व ट्रायकोडर्माची आंबवणी करावी. कपांमधून रोप काढतांनी, कपांमधील कोकोपीट माध्यम हलक्या हाताने दाबावे व अलगत रोप कपांमधून बाजूला करून लागवड करावी.
Picture1.jpg मिरचीच्या लागवडीचे यश चांगल्या जोमदार रोपावर अवलंबून असते.
• रोपवाटिका तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करावेत. बियाण्याची पेरणी केल्यापासून ४ ते ६ आठवड्यांनी आणि १५ ते २० से.मी. वाढली की रोपांची लागवड करावी.
• रोप तयार करण्यासाठी ३४२ मी. लांबी रुंदीचे आणि २० से.मी. उंचीचे गादी वाफे तयार करावेत.
• प्रत्येक गादी वाफ्यावर चांगले कुजलेले २ घमेले शेणखत, ३० ते ४० आणि ग्रॅम डायथेन एम- ४५ मिसळून घ्यावे.
• वाफ्याच्या रुंदीला समांतर दर १० से.मी. अंतरावर खुरप्याने २ ते ३ से.मी. खोल ओळी कराव्यात. या ओळीत बियाण्यांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकावे आणि हलके पाणी द्यावे.
• उगवण झाल्यावर ५ ते ६ दिवसांनी रोपवाटिकेस पाणी द्यावे.
• बी पेरल्यानंतर २० ते २५ दिवसांनी रोपाच्या वाढीसाठी प्रत्येक वाफयात ५० ग्रॅम युरिया द्यावा.
• परंतू जास्त प्रमाणात युरिया खताचा वापर टाळावा. त्यामुळे रोपे उंच वाढतात आणि लुसलुशीत राहतात. त्यामुळे रोपांची लागवड केल्यानंतर रोप मरण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे योग्य प्रमाणात वापर करणे फायद्याचे ठरते.
• सर्वसाधारणपणे बियाण्यांची परेणी केल्यापासून ४० ते ५० दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.
• रोपवाटिकेत रोपे निरोगी ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. किडींच्या नियंत्रणासाठी, निंबोळी अर्क ४% किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८% एस. एल. ५ मिली किंवा फिप्रोनील ५% एस.सी. १५ मिली प्रति १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोपे ३ ते ४ आठवड्यांची असतांना डायथेन एम- ४५ (२० ते २५ ग्रॅम) १० लिटर पाण्यात फवारणी करावी. त्यामुळे फुलकिडे, तुडतुडे यांचे नियंत्रण होऊन बोकड्या (पर्णगुच्छ ) या रोगांपासून संरक्षण होते.
मिरची लागवडीकरिता साधारणपणे हेक्टरी १.० ते १.२५ किलो बी पुरेसे होते. यामध्ये वाण आणि लागवडीचे अंतर यानुसार फरक पडू शकतो. बियाण्याचे प्रमाण मिरचीच्या योग्य जातीची निवड केल्यानंतर रोपे तयार करण्यासाठी चांगली उगवण क्षमता असलेले, उत्कृष्ट दर्जाचे, अत्यंत खात्रीशीर बियाणे खरेदी करावे. बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम स्फुरद जिवाणू तसेच ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करावी.
• उंच आणि पसरट वाढणाऱ्या वाणाची लागवड ७५ X ६० किंवा ६० x ६० से.मी. अंतरावर करावी.
• तर बुटक्या वाणाची लागवड ६० X ४५ से.मी. अंतरावर करावी.
• काळ्या कसदार भारी जमिनीमध्ये लागवडीचे अंतर जास्त ठेवावे.
मिरची पिकाची लागवड सरी वरंब्यावर करतात.
• उन्हाळी हंगामातील मिरची पिकाची लागवड १५ जानेवारी ते फेब्रुवारी अखेर पर्यंत करावी तर खरीप हंगामातील मिरचीची लागवड जून- जूलैमध्ये करावी.
• लागवडीपूर्वी एक दिवस अगोदर रोपवाटिकेस हलके पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची काढणी सुलभ होते आणि रोपाची मुळे तुटत नाहीत.
• तसेच रोपांची लागवड करतांना जास्त लांब असलेली मुळे खुरप्याने तोडावीत किंवा जास्त उंचीची रोप असल्यास रोपाचा शेंडा कट करुन लागवडीसाठी वापरावीत.
• लागवडीपुर्वी रोपांची मुळे जैविक खते जसे की; स्फुरद जिवाणू, अॅझोटोबॅक्टर द्रावणात बुडवून घ्यावीत. तसेच, लागवड झाल्यावर ट्रायकोडर्माचे द्रावणाची मुळ्यांभोवती चुळ भरावी.
• लागवड शक्यतो सायंकाळच्या वेळी करावी.
• लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी आंबवणी पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची मर कमी होण्यास मदत होते आणि त्यानंतर जमिनीच्या मगदूराप्रमाणे आणि हंगामानुसार पाणी द्यावे.
• पेंडीमेथालिन @1ltr/acre किंवा Fluchloralin @800ml/acre हे तण उगवणीपूर्व तणनाशक म्हणून लागवडीच्या पूर्वी वापरावे आणि त्यानंतर लागवडीनंतर मिरचीच्या रोपांच्या लागवडी नंतर पहिली खुरपणी 20 ते 25 दिवसांनी करावी.
• लागवडीनंतर २५ दिवसांनी पहिली खुरपणी करा.
• तणांच्या तीव्रतेनुसार, ८-१० दिवसांच्या फरकानी खुरपणी करावी आणि शेत तणमुक्त ठेवा.
• खरीप मिरचीला लागवडीनंतर २ ते ३ आठवड्यांनी रोपांना मातीची भर द्यावी.
• मिरची पिकाच्या बाबतीत रोपांच्या लागवडीनंतर दोन महिन्यांनी हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी मातीची भर द्यावी.
मिरचीच्या पिकासाठी NPK शिफारसीचा सर्वसाधारण डोस ४८ : २४:१६ किलो/एकर आहे . त्याच्या वाढत्या हंगामामुळे, वाढीच्या सर्व टप्प्यांवर पोषक तत्वांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी खत आणि खते काळजीपूर्वक विभाजित डोसमध्ये वापरणे महत्वाचे आहे.
पोषक द्रव्य खत मात्रा खत देण्याची वेळ
सेंद्रिय शेणखत 10 टन/एकर शेवटच्या नांगरणीच्या/वखरणी वेळी
जैविक खत
अझोस्पिरिलियम 1 लिटर उत्पादन + 50 किलो शेणखत
फॉस्फोबॅक्टेरिया 1 लिटर उत्पादन + 50 किलो शेणखत
वखरणी /नांगरणीच्या वेळी
नत्र युरिया
26 किलो लागवडीच्या वेळी
26 किलो लागवडीनंतर ३० दिवसांनी
26 किलो लागवडीनंतर ६० दिवसांनी
26 किलो लागवडीनंतर ९० दिवसांनी
स्फुरद सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) 150 किलो लागवडीच्या वेळी
पालाश पोटॅशियम सल्फेट (SOP)
13 किलो लागवडीच्या वेळी (पोटॅशियम सल्फेट ने मिरचीचा दर्जा सुधारेल)
13 किलो लागवडीनंतर २०- ३० दिवसांनी
सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन
बोरॉन बोरॉन-२० % 1 ग्रॅम/लिटर पाणी 1 ली फवारणी – फुलांधारणेच्या आधी 2 री फवारणी - 10 ते 12 दिवसांच्या अंतराने
झिंक झिंक फवारणीद्वारे - ०.५ - ०.६ ग्रॅम/लिटर पाणी लागवडीनंतर ४० दिवसापासून 10 दिवसांच्या अंतराने 3 फवारण्या.
नत्र:स्फुरद:पालाश + मायक्रो न्युट्रीयट १९:१९:१९ + सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीद्वारे - 1 ग्रॅम/लिटर पाणी लागवडीनंतर ६० दिवसांनी
• मिरची पिकाला जमिनी नुसार आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार पाणी द्यावे.
• मिरची हे पिक जास्त ओलावा सहन करू शकत नाही म्हणून जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच सिंचन करा. प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी पाणी देऊ नये.
• झाडे फुलावर आणि फळावर असताना झाडांना पाण्याचा ताण द्यावा आणि रोपे लावणीनंतर दहा दिवसात शेतात रोपांचा जम बसू द्यावा.
• त्यानंतर पाच दिवसांच्या किंवा एक आठवड्याच्या अंतराने झाडांना पाणी द्यावे. पावसाळ्यात १५ -२० दिवसांच्या, हिवाळ्यात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यामध्ये ५ ते ६ दिवसांच्या अंतराने मिरची पिकाला पाणी द्यावे.
• जर तुम्ही सिंचनाच्या स्थितीत मिरचीची लागवड करत असाल तर फरो किंवा ठिबक सिंचनाचा अवलंब करा . तुषार सिंचन टाळता येऊ शकते कारण ते पाने ओले झाल्यामुळे रोगाच्या विकासास प्रोत्साहन देते. रोपवाटिका आणि शेतात पाणी साचू देऊ नये कारण त्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होतो.
कीटक लक्षणे नियंत्रण/उपाय
फळ पोखरणारया अळ्या अळ्या पिकाची पाने खातात नंतर फळात शिरतात आणि उत्पादन व्यवस्थापनात मोठे नुकसान होते. • खराब झालेली फळे आणि प्रौढ अळ्या गोळा करून नष्ट करा. हेलिकव्हरपा आर्मिगेरा किंवा स्पोडोप्टेरा लिटुरासाठी फेरोमोन सापळे ५ नग/एकरवर लावा.
• अळ्यांच्या नियंत्रणासाठी कोंडा-5 किलो, कार्बारील-500 ग्रॅम, गूळ-500 ग्रॅम आणि पुरेसे पाणी यापासून बनवलेले विष गोळे वापरावेत.
• फळझाडांचा प्रादुर्भाव आढळल्यास पॉवर स्प्रेयरने 12 लिटर पाण्यात क्लोरपायरीफॉस + सायपरमेथ्रिन @30 मिली + टीपोल @ 0.5 मिली फवारणी करा. इमामेक्टिन बेंझोएट 5% SG @ 4 gm/10 लिटर पाण्यात किंवा फ्लुबेंडियामाइड 20 WDG @ 6 gm/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
फूलकिडे (थ्रिप्स) हे किटक आकाराने अतिशय लहान म्‍हणजे 1 मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्‍यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्‍यामुळे त्यामुळे पाने कुरकुरीत होतात आणि पानाच्‍या कडा वरच्‍या बाजूला चुरडलेल्‍या दिसतात. हे किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्‍यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते. प्रभावित फुलांच्या कळ्या ठिसूळ होतात आणि नंतर खाली पडतात. • थ्रिप्सच्या प्रादुर्भावाची तीव्रता तपासण्यासाठी निळे चिकट सापळे @6-8 प्रति एकर ठेवा.
• तसेच प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व्हर्टिसिलियम लेकानी @ 5gm/Ltr पाण्यात फवारणी करावी.
• थ्रीप्सचा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8SL किंवा फिप्रोनील@1ml/Ltr पाणी किंवा फिप्रोनील 80%WP@2.5ml/Ltr पाणी किंवा ऍसेफेट 75% WP@1.0gm/Ltr ची फवारणी करा. किंवा थायामेथॉक्सम 25% WG@1.0gm/Ltr पाण्यात ड्रेंचिंग करा.
मावा (ऍफिड्स) ते हिवाळ्याच्या महिन्यात आणि पिकाच्या नंतरच्या अवस्थेत आक्रमण करतात. ते पानातून रस शोषतात. ते मध सारखे पदार्थ उत्सर्जित करतात आणि त्यावर काजळीचा म्हणजेच बुरशीचा विकास होतो. कॅलिक्स आणि फळांवर काळ्या रंगाची बुरशी येते त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता खराब होते. ऍफिड्स मिरची मोझकसाठी महत्त्वाचे कीटक वाहक म्हणून देखील काम करतात. ऍफिड्सद्वारे पसरलेल्या मोझॅक रोगामुळे उत्पादनात 20-30 टक्के नुकसान होते. • नियंत्रणासाठी एसीफेट ७५ एसपी @ ५ ग्रॅम/लिटर किंवा मिथाइल डेमेटॉन २५ईसी@२ मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• लागवडीनंतर 15 आणि 60 दिवसांनी कर्बोफ्युरान/फोरेट @ 4-8kg/एकर ग्रॅन्युलर कीटकनाशकांचा जमिनीमध्ये वापर देखील प्रभावी ठरला.
पांढरी माशी पांढऱ्या माशीचे पिल्ले आणि प्रौढ पानातील पेशी रस शोषून घेतात आणि झाडे कमकुवत करतात. ते मधद्रव्य स्राव करतात ज्यावर पानांवर काळा काजळीचा साचा तयार होतो. ते लीफ कर्ल रोग देखील प्रसारित करतात. • प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रीस आणि चिकट तेलाने लेपित पिवळे चिकट सापळे वापरा.
• तीव्र प्रादुर्भाव असल्यास नियंत्रणासाठी ऍसिटामिप्रिड २० एसपी (@४ ग्रॅम/१० लिटर पाण्यात किंवा ट्रायझोफॉस@२.५ मिली/लिटर किंवा प्रोफेनोफॉस@२ मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. १५ दिवसांनी फवारणी पुन्हा करा.
रूट गाठ नेमाटोड संक्रमित झाडे पाने पिवळी पडण्याची किंवा क्लोरोसिस आणि कोमेजण्याची चिन्हे दर्शवू शकतात. मुळांवर लहान गाठींची उपस्थिती. • 2 किलो ट्रायकोडर्मा हार्झेनियम 100 किलो चांगले कुजलेले कंपोस्ट मिसळा आणि एक एकरवर वापरावे.
• फ़्लुओपाय्रम नेमॅटिसाइड 1.2 - 1.5 मिली/लिटर पाण्यातून ड्रेंचींग करावी.
रोग आणि त्यांचे नियंत्रण
मिरची मर रोग हा रोग कोलीटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. ओलसर आणि खराब निचरा होणारी माती रोगास कारणीभूत ठरते. हा मातीजन्य रोग आहे. खोड पाण्यात भिजते आणि मुरगळते. रोपे उदयापूर्वी मारली जातात. रोपवाटिकेत दिसल्यास संपूर्ण रोपांचा नाश होऊ शकतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्‍या हिरव्‍या किंवा लाल मिरचीवर वतुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चटटे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्‍या फांद्या शेंडयाकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगांचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात झाल्‍यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात. • या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्‍यांचा नाश करावा. तसेच डायथेन झेड-78 किवा डायथेन एम 45 यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्‍यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्‍या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे. किंवा
• नियंत्रणासाठी पिकाजवळची माती कॉपर ऑक्सीक्लोराईड @ 250 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम @ 200 ग्रॅम/ 150 लिटर पाण्यात ड्रेंच करावी. मुळे कुजल्यामुळे पिकांची मर नियंत्रित करण्यासाठी झाडांच्या मुळांजवळ ट्रायकोडर्मा बायो फंगस @ 2.5kg/500Ltr पाण्यात ड्रेंचींग करावी.
भुरी रोग भूरी रोगामुळे मिरचीच्‍या पानाच्‍या वरच्‍या आणि खालच्‍या बाजूवर पांढरी भूकटी दिसते. ते परजीवी बनून वनस्पतीला अन्न स्रोत म्हणून वापरते. हे सामान्यतः जुन्या पानांवर किंवा फळांच्या सेटच्या आधी आढळते. परंतु पीक विकासाच्या कोणत्याही टप्प्यावर ते विकसित होऊ शकते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात झाल्‍यास झाडाची पाने गळतात. • शेतात पाणी साचणे टाळावे. शेत स्वच्छ ठेवा. नियंत्रणासाठी हेक्साकोनाझोल (कॉन्टाफ, सितारा)+ स्टिकर @ 1 मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
• अचानक पाऊस झाल्यास, पावडर बुरशीची शक्यता जास्त असते. सौम्य प्रादुर्भावासाठी पाण्यात विरघळणारे सल्फर @ २० ग्रॅम/10 लिटर पाण्यात मिसळून 2-3 वेळा 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
अँथ्रॅकनोज किंवा फळ सड हे कोलेटोट्रिचम पिपेरेटम आणि सी.कॅप्सिसी या बुरशीमुळे होते आणि उबदार तापमान, उच्च आर्द्रतेमुळे त्याचा प्रसार होतो. मिरचीच्या झाडांच्या पानांवर, देठांवर किंवा फळांवर लहान, पाण्यात भिजलेले घाव दिसतात. डाग सामान्यतः गोलाकार, पाण्यात भिजलेले आणि काळ्या मार्जिनसह बुडलेले असतात. फांद्या टोकापासून खालच्या दिशेने (डायबॅक) नेक्रोटिक लक्षणे दर्शवितात. गडद, बुडलेल्या डागांसह फळ कुजतात आणि रंगहीन होतात. पुष्कळ डाग असलेली फळे अकाली गळतात, परिणामी उत्पादनाचे मोठे नुकसान होते. • स्यूडोमोनास फ्लोरोसेन्स 3 ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किवा
• अँथ्रॅकनोजचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोपिकोनाझोल किंवा हेक्साकोनाझोल @1ml/Ltr पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• विल्वम' वनस्पतीच्या पानांच्या अर्काची फवारणी करा.
जीवाणूजन्य पानांचे ठिपके हे मुख्यतः पावसाळ्यात दिसून येते. कोवळ्या पानांवर डाग पिवळसर हिरवे असतात, जुन्या पानांवर ते गडद आणि पाण्यात भिजलेले असतात. गंभीरपणे प्रभावित पाने क्लोरोटिक बनतात आणि गळून पडतात. हे स्टेमवर देखील निरीक्षण केले. स्टेम इन्फेक्शनमुळे व्रनांची वाढ होते आणि फांद्या कोमेजतात. फळांवर गोलाकार पाण्यात भिजलेले फिकट पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात. • रोग नियंत्रित करण्यासाठी, प्रोपिकोनाझोल 25% EC@200ml किंवा क्लोरोथॅलोनिल 75%WP @400-600gm प्रति 150-200Ltr पाण्यात मिसळून फवारणी करा.
• पानावर जिवाणूंचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन @ 1 ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड @ 400 ग्रॅम/200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिवळा मोझॅक पानांवर हलके आणि हिरवे ठिपके दिसतात. सुरुवातीच्या अवस्थेत रोपांची वाढ थांबते. पाने आणि फळांवर पिवळे, क्लोरोटिक रिंग स्पॉट्स दिसतात. पाने पिवळसर होणे आणि कुरळे होतात. फळे चुकीची किंवा आकाराने लहान येतात. • ऍफिड्ससाठी दिलेल्या शिफारशींचा अवलंब केला जाऊ शकतो (एसीफेट 75SP@1gm/Ltr किंवा मिथाइल डेमेटॉन 25EC@2ml/Ltr पाण्यात मिसळून फवारणी करा.
• मातीत ग्रेन्युलर कीटकनाशके उदा. कार्बोफुरन/फोरेट@4-8kg/एकर लागवडीच्या १५ आणि ६० दिवसांनी द्यावे.
पाठीमागे मरणे आणि फळे कुजणे (डायबक) फांद्या आणि पाने सुकतात आणि संक्रमित भागांवर काळे डाग पडतात. डाग सामान्यतः गोलाकार, पाण्यात भिजलेले आणि काळ्या मार्जिनसह बुडलेले असतात. पुष्कळ डाग असलेली फळे अकाली गळतात, परिणामी उत्पादनाचे मोठे नुकसान होते. पावसाळ्यात वाहणारा वारा, पावसामुळे हा रोग झपाट्याने पसरतो. अंशतः प्रभावित झाडांना फळे येतात जी कमी आणि कमी दर्जाची असतात. • रोगमुक्त बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी थिरम किंवा कॅप्टन @ 4gm/किलो बियाण्यावर प्रक्रिया केल्यास बीजजन्य इनोकुलम नष्ट होण्यास प्रभावी ठरते.
• डाई बॅक आणि फळ कुजण्याच्या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब @ 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड @ 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पहिली फवारणी फुले येण्यापूर्वी आणि दुसरी फवारणी फळे येण्याच्या वेळी द्यावी.
Cercospora पानांचे ठिपके टॅन ते तपकिरी मध्यभागी आणि गडद किनारी असलेले डाग मोठे आणि गोल/अंडाकृती आहेत. • स्यूडोमोनास फ्लूरोसेन्स आणि बॅसिलस सबटिलिस 5 - 10 ग्रॅम / लिटर पाण्यात फवारणी करा .
• डायथेन एम-४५ बुरशीनाशकाची फवारणी ३-४ ग्रॅम/लिटर पाण्यात करा.
• कॉपर ऑक्सीक्लोराईड बुरशीनाशकाची फवारणी 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात करा.
Fusarium फुझ्यारीयम मर पाने पिवळसर होणे आणि कोमेजणे. पाने वर आणि आतील बाजूस वळतात. खोड आणि अंतर्गत ऊतींमध्ये तपकिरी रंगाचा रंग येतो. • ट्रायकोडर्मा विरिडी २.५ मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
• कार्बेन्डाझिम बुरशीनाशक 2 ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळून फवारावे .